- प्रशासनाचे आभार; आता कल्याणकारी मंडळासाठी एकजुटीने लढू – बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ नोव्हेंबर २०२१) :- पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या विभागांमध्ये पहिल्या दीड किलोमीटर टप्प्यास रिक्षा मीटरसाठी तीन रुपये भाडेवाढ देण्यात आली आहे. पुढील प्रत्येक किलोमीटर साठी १४ रुपये दरवाढ देण्यात आली आहे.
ही भाडेवाढ म्हणजे रिक्षाचालक-मालक यांनी दिलेल्या लढ्याला यश आहे. आता कल्याणकारी महामंडळाच्या मुद्द्यासाठी एकत्र येऊन लढू. यातही आपण विजय मिळवू. भाडेवाढ केल्याबद्दल प्रशासनाचे आभार, असे म्हणत बाबा कांबळे यांनी या लढाईचे श्रेय रिक्षाचालक-मालक यांना दिले आहे.
बाबा कांबळे म्हणाले, रिक्षा मीटर भाडेवाढ संदर्भात हकीम समिती यांच्या सूत्रानुसार दर एक मे ला आम्हाला भाडेवाढ मिळत होती, परंतु परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात त्यांनी हकीम समितीचा निर्णय रद्द करून खटुआ समिती नेमली. या समितीने देखील भाडेवाढीची शिफारस केली. खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, अशी महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर संघटनांची आग्रही मागणी होती. यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्यक्ष शफिकभाई पटेल, उपाध्यक्ष अरशद अन्सारी, कार्याध्यक्ष कुमार शेट्टी, मोहम्मद शेख, किरण एरंडे, मुराद काजी, अन्सारी शेख, आयाज शेख, विलास केमसे, संजय गुजलेकर यांनी वेळोवेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देऊन या विषयाचा पाठपुरावा केला. त्याचे हे फलित आहे.