- कामगार नेते बाबा कांबळे यांची मोदी सरकारकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) :- शेतकऱ्यांनी एकजुट दाखवुन आंदोलन केले. देशभर संतापाची लाट उसळली. शेतकऱ्यांचा उद्रेक पाहुन अन्याकारक कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याच धर्तीवर वाहतूकदार, कष्टकरी, बेघर आदींची देखील जाचक कायद्यातून मुक्तता करावी, असे आवाहन कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र वाहतूक पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कामगारांसाठी केलेले जाचक कायदे व टेम्पो, बस, ट्रक व रिक्षासह देशातील सर्वच वाहतूक दार, कष्टकऱ्यांसाठी केलेले जाचक कायदे रद्द झालेले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांचा आदर्श ठेवून देशातील कामगार, कष्टकरी, वाहतूकदारांनी संघर्ष सुरू ठेवणे आवश्यक आहे. ट्रक, बस टेम्पो डंपर रिक्षासह वाहतूक करणाऱ्या घटकांसाठी केंद्रीय परिवहन खात्याच्या अंतर्गत नवीन विधेयक पारित केले आहेत.
याबरोबरच कुठल्याही परिस्थितीमध्ये कामगारांना कामावरून काढण्याचे अधिकार मालकांना दिले आहेत. कामगारांना कायम न करता त्यांना कंत्राटी पद्धतीने गुलामासारखे वागवण्याचा अधिकार मालकांना दिला आहे. वाहतूकदारांना आर्थिक दंड, १५ वर्षानंतर वाहन स्क्रॅप करणे, भांडवलदारांना नफा आणि फायदा मिळवून देणारे अनेक जाचक कायदे मोदी सरकारने रद्द करावेत, असे या निवेदनात कांबळे यांनी म्हटले आहे.