- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेचे अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- राजमाता जिजाऊ माँ साहेब या जगातील आदर्श माता, राजनीतिज्ञ तसेच स्वराज्यप्रेरिका होत्या त्यांनी दिलेल्या प्रेरणामुळे आणि मार्गदर्शनामुळे रयतेचे राज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील आदर्श राजे म्हणून ओळख निर्माण झाली तर स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील परिषदेत ” बंधूंनो आणि भगिनींनो ” अशा शब्दांत आपल्या भाषणाची सुरूवात करून भारताच्या बंधुभावाच्या शिकवणीचा परिचय सर्वांना दिला असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी जगताप बोलत होते.
या जयंती कार्यक्रमास उपआयुक्त रविकिरण घोडके, संदीप खोत, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट,वामन नेमाणे, प्रशांत जोशी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, स्थापत्य उप अभियंता कविता माने ,दूरध्वनी पर्यवेक्षक रतन वारंग,उपलेखापाल गीता धंगेकर, मनीषा काटकर, शितल पवार,प्रमिला वाघमोडे कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे,बालाजी अय्यंगार तसेच सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर तसेच कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ माँसाहेब या त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात, त्या स्वतः युद्धकलेत निपुण होत्या तसेच कुशल प्रशासक देखील होत्या असेही जगताप म्हणाले.