न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२३) :- २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. २५) १३ वा ‘राष्ट्रीय मतदार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून आयोगाचा हा स्थापना दिवस २०११ पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. नवमतदारांचे नाव नोंदवणे, त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमास २०७ भोसरी विधानसभेचे प्रभारी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी भाऊ गलांडे, संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे, डॉ. हंसराज थोरात – प्राचार्य शरदचंद्र पवार महाविद्यालय,डुडुळगाव, डॉ. सुनील धनवटे, प्राचार्य- शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्च, चिखली, पांडुरंग पवार – सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार, सीताराम बहुरे – सहा. मतदार नोंदणी अधिकारी, शुभदा पंडित नायब तहसीलदार, सुनिल कास्टेवाड महसूल सहायक, राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे उपप्राचार्य किरण चौधरी, प्रबंधिका अश्विनी भोसले-चव्हाण, जुनियर महाविद्यालयाच्या प्रचार्या डॉ. नेहा बोरसे, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रेया दाणी, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभास उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने स्वागत-सत्कार करण्यात आले. त्यानंतर मतदारांसाठी सार्वत्रिक प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले, तसेच मतदानाचा अधिकार अमूल्य असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मतदान जनजागृती विषयी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अण्णा बोदडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी मतदार नोंदणी अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील व इतर ४ महाविद्यालयातील प्राचार्य, BLo व पर्यवेक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राजमाता महाविद्यालयामध्ये जिल्हाधिकारी, पुणे यांच्या निर्देशनवे आयोजित Mega Camp मध्ये एकूण ११८९ नवीन नव मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच मतदार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थ्यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुग्रीव अडाल यांनी तर, आभार प्रदर्शन प्रा. रेश्मा लोहकरे यांनी मानले. विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.