न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसचा जोर लक्षात घेता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये सकाळी ६.०० वाजता १४०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे.
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता त्यानूसार सकाळी ८.०० वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून २१०० क्यूसेक्स असे एकुण ३५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच आंद्रा धरणात १०० टक्के जलसाठा झालेला आहे. धरण “द्वारविरहित” आहे, त्यामुळे पाऊस व धरणातील येवा वाढत गेल्यास त्यानुसार धरण पूर्ण भरून सांडव्यावरून आंध्रा नदीपात्रात अनियंत्रित विसर्ग चालू होईल.
त्यामुळे पवना नदी आणि आंद्रा नदीकाठच्या नागरीकांनी नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.