न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- गेले काही दिवस आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात मोठी घट झाली होती. फक्त २१ एमएलडी पाणी शहरासाठी मिळत होते. पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या भीषण झाली होती. महापालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानुसार पूर्वीप्रमाणे ८० एमएलडी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र, तक्रारी कायम आहेत. शहरवासीयांना मावळातील पवना धरणातून आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो.
महापालिका दिवसाला पवना धरणातून ५२०, आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून १५ असे ६१५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. मात्र, आंद्रा धरणातून वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, च-होली, मोशी, डुडुळगाव या उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली होती.