- राज्यातील प्रमुख उद्योजकांचा कलाजीवन संस्थेकडून सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मे २०२४) :- विदर्भातील अमरावती जिल्ह्यतील वरुड येथे संपन्न झालेल्या कलाजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकताच राज्यातील प्रमुख उद्योजकांचा व्यवसायात प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल तसेच उपेक्षितांना व्यवसायात संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल “महाराष्ट्र उद्योगरत्न” पुरस्कार देऊन सन्मान केला गेला.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती अभिनेत्री विदिशा म्हसकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ निलकंठ यावलकर,संस्थेचे अध्यक्ष कलाकार युवराज ठाकरे, यहोवा यिरे फाऊंडेशन चे सी ई ओ डॉ.रमेशकुमार बोरकुटे,संचालिका मोनिका इंगळे, भाग्यश्री वानखेडे, लायन अनिल नारेदी,पराग भोंडे,डॉ चरण सोनारे,नितीन ठाकरे यांची होती.
या प्रसंगी राज्यातील प्रमुख उद्योजकांची कलाजीवन संस्थेच्या वतीने “थेट मुलाखत” चे आयोजन करण्यात आले. उद्योगात येणाऱ्या अडचणी व राज्यात उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधी यावर उद्योजकांनी आपले मत व्यक्त केले. उद्योजक डॉ.विजयकुमार पाटील, स्वप्निल वैद्य,अंकुश पेठे,निकुंज पाटील,पूजा पाटील, प्रगती पांडे,अमोल व्यवहारे,प्रज्ञा राऊत, सतीश व वैशाली मोहरकर,अशोक जाधव,अनुरिता ढोलकिया,अतुल सुतार,सुवर्णा जानवे,सचिन कर्णिक,प्रणाली कदम,कलिम कुरेशी, सारिका टोंगे, मंदाताई थेटे, वैशाली राठोड,संतोष उघडे,उन्नती बनसोड,बबिता जवेरी, निलेश तायडे,प्रशांत भोयर, उर्मिला बोबडे,कल्याणी टिळक,अतुल बनसोड,डॉ प्रिया पवार,प्रतिभा तायडे,सचिन पानघाटे,निलेश अतकरे,सुलोचना गेडाम,प्रविण काटवटे,प्रांजली काळमेघ, मिलिंद डहाके,चंद्रकिशोर मांडवकर यांना “महाराष्ट्र उद्योजकरत्न २०२४” या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
याप्रसंगी अभिनेत्री विदिशा म्हसकर म्हणाल्या,” कलेचे क्षेत्र असो की व्यवसायिक क्षेत्र दोन्ही क्षेत्रामध्ये कमालीचा संघर्ष करावाच लागतो. दोनही क्षेत्रात अनेकांना बरोबर घेऊन, एकत्रित व्यवस्थापन करूनच यश संपादन करावे लागते.
डॉ रमेशकुमार बोरकुटे म्हणाले,” थेंबे थेंबे जसे तळे साचते तसेच प्रत्येक व्यक्तीपर्यंत व्यवसायिकाने पोहचणे आवश्यक ठरते, एकाने सुरवात होऊन अनेकांपर्यंत पोहचल्यास उद्योग यशस्वी ठरतो.
संस्थेचे अध्यक्ष उद्योजक युवराज ठाकरे म्हणाले,” चिकाटी, धैर्य, संयम आणि कष्ट यांच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करून उद्योगात यशस्वी होता येते.आज राज्यातील प्रमुख उद्योजकांचा या कार्यक्रमात सन्मान करताना कलाजीवन संस्थेला अभिमानास्पद वाटत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव पराग भोंडे यांनी केले, व सूत्रसंचालन अभिनेता अतुल चव्हाण यांनी केले.