- प्रीतम प्रकाश महाविद्यालयात शिक्षणाच पुन्हा दार उघडलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- विद्यार्थी चैतन्याचा झरा आहे. समाज, कुटुंब, शिक्षण, अर्थकारण, संस्कृती, राजकारण व पर्यावरण या परिघातून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होते. कधी कधी अशी काही संकटे येतात की ती बरेच काही शिकवून जातात. गेली अकरा महिने व आजतागायत ज्याचे अस्तित्व आहे, अशा कोरोनाने बरंच काही शिकवलं व भल्याभल्यांना घरी बसवलं. विद्यार्थ्यांनो आव्हाने स्वीकारा तरच सक्षम बनाल, असे आवाहन डॉ. अशोक पगारिया यांनी केले.
भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालयाची दार उघडली. या वेळी आयोजित कार्यक्रमात पगारिया बोलत होते. ते म्हणाले, प्रत्येक जण पडेल ते काम करू लागला. या कोरोना ने बरच काही शिकवलं, मात्र भल्याभल्यांना काव्यपंक्तीतून आपल्या भावनेला घरी बसवलं. जरी न भूतो ना भविष्य असलं तरी आलेल्या संकटाने जगण्यामध्ये सक्षमता, कणखरपणा, ताठरपणा आणला.
प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय अधिकारी प्रा. पांडुरंग भास्कर, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. स्वाती वाघ, प्रा. ब्राह्मणकर, प्रा. रूपाली आगळे, प्रा. सचिन पवार, प्रा. उमेश लांडगे, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.