- अद्याप ५० टक्केही प्रवेश नाहीत..
- राज्य शासनाच्या आडमुठी धोरणामुळे खासगी शाळांचा आक्रमक पवित्रा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शहरात प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शहरात आरटीई अंतर्गत ३६६४ जागा आहेत. सद्यस्थितीत त्यातील ११४५ जागांवर प्रवेश झाले आहेत, तर २३१९ जागा अद्याप शिल्लक आहे.आरटीई प्रवेशाच्या राखीव जागांवर ५० टक्केही प्रवेश झालेले नाहीत, अशी सद्यस्थिती आहे.
यंदा कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. त्यातच वेळेत प्रवेश न झाल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा प्रवेशप्रक्रियेला उशीर होणार आहे. आता प्रवेश घेण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदत असणार आहे. आरटीई प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नंबर लागलेल्या संबंधित शाळेत प्रवेश घ्यावेत, असे आवाहन महापालिकेचे सहायक शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांनी केले आहे.
मात्र, खासगी विनाअनुदानित शाळांना राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून आरटीई परताव्याची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे खासगी शाळांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.