न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 05 जुलै 2025) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्बन स्ट्रीट प्रकल्पामुळे गंभीर झालेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला.
आमदारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच शहरी विकास विभागाने सांगितले की, महापालिकेला अशा प्रकल्पांच्या अंमलबजावणीत वाहतूक व्यवस्थापनाची योग्य काटेकोर योजना आखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित रस्त्यांचे रिडिझायनिंग, ट्रैफिक सिग्रल सिंक्रोनायझेशन आणि पार्किंग व्यवस्थेवरही राज्य सरकार लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहनचालकांसाठी असलेला जागा अलिकडेच आणि ५० टक्के जागेत पार्किंग, सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक आणि रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी वापरात आणली गेली आहे. परिणामी प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी उपयुक्त असलेली रस्त्याची रुंदी घटली असून, वाहतुकीचा मोठा भार या मार्गावर पडत आहे. विशेष म्हणजे मोरवाडी सिग्ग्रल पास करण्यासाठी वाहनचालकांना तीन ते चार सिग्नल पार करावा लागत आहे. परिणामी, सकाळी व संध्याकाळी कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. नागरिकांचा प्रवास वेळ व इंधन दोन्ही वाया जात असून, प्रदूषणातही भर पडत आहे.
ही गभीर स्थिती लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरातील आमदारांनी चालू पावसाळी अधिवेशनात हा विषय विधीमंडळात उपस्थित केला. आमदारांनी सरकारकडे मागणी केली की, अर्बन स्ट्रीटसारख्या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष वाहतुकीवर होणाऱ्या परिणामाचा सखोल अभ्यास करूनच निर्णय घेतला जावा. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र वाहतूक मार्ग, अंडरपास किंवा फ्लायओव्हर यावरही विचार होणे गरजेचे आहे.