न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज शनिवार (२० ऑक्टो.) रोजी महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
नगरसेवकपदी निवड होऊन व सत्तेत येऊन दीड वर्षापेक्षा अधिक काळ उलटूनही पाण्याचे गौडबंगाल काय? हे आम्हास समजले नाही, तसेच प्रशासन पाणीपुरवठाबाबत काय नियोजन करते? कशाप्रकारे करते? कि केवळ कृत्रीम पाणीटंचाई करून कोणा तिऱ्हाईताचे घर भरते कि काय? असा आरोप भाजपचे नगरसेवक विकास डोळस यांनी सर्वसाधरण सभेत प्रशासनावर केला.
विकास डोळस म्हणाले कि, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावरून प्रत्येक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधक पोटतिडकीने प्रशासनासमोर प्रश्न मांडतात, परंतु अधिकारी केवळ तांत्रिक अडचण असल्याची कारणे देतात.
अभियंत्यांना तांत्रिक समस्या सोडविता येत नाहीत, दिघी, बोपखेल प्रभागातील नागरिक पाणीसमस्यामुळे मेटाकुटीस आली असून, लोकप्रतिनिधींच्या घरासमोर नागरिक आंदोलन करीत आहेत. त्यामुळे घरातील सदस्यांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
महापालिका आयुक्त व प्रशासनाने पाणीसमस्या तात्काळ सोडवावी. महापालिकेची क्षमता नसेल तर नवीन गृह प्रकल्पांना नळ कनेक्शन देण्यात येऊ नयेत. तसेच नगररचना विभागातील अधिकाऱ्याची सहा महिन्यातून एकदा पाणीपुरवठा विभागात बदली करावी अशा स्वरूपाची मागणी नगरसेवक विकास डोळस यांनी सर्वसाधारण सभेत केली.