न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२०) :- कोरोना चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आळंदीतील सर्व धार्मिक स्थळ, हॉटेल्स, लॉज बंद करण्यात आले आहेत. आळंदीमध्ये प्रवेश बंदी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका प्रस्थान सोहळा १३ जून रोजी शासनाने परवानगी दिलेल्या मोजक्या विश्वस्त, सेवेकरी आणि वारकरी जे मंदिरातच राहत आहेत यांच्यामार्फत केला जाणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आळंदीमध्ये न येता जिथे वास्तव्यास आहेत तिथूनच थेट प्रेक्षपणाद्वारे माऊलींच्या पालखी सोहळ्यास पूजा आणि सेवा अर्पित करावी. आळंदीमध्ये प्रवेश केल्यास नागरिक, भाविकांना १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येईल. तसेच, ना विलाजास्तव कारवाई करावी लागेल, अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.