न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट. २०२०) :- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पिंपरी-चिंचवडकर मागील साडेआठ महिन्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात आहेत. पावसाळ्यात धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईल आणि दररोज पाणीपुरवठा मिळेल अशी शहरवासीयांना आशा होती. पण, पावसाने ओढ दिली आहे.
पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणार्या पवना धरणात गतवर्षीपेक्षा तब्बल ६७ टक्के कमी पाणीसाठा आहे. धरणात आजमितीला ३३ टक्के पाणीसाठा असून दोन महिने पुरेल एवढा हा साठा आहे. परंतु, गतवर्षी आजच्या तारखेला धरणात तब्बल १०० टक्के पाणीसाठा होता.
जून, जुलै या दोन महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात अगदी कमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाने ओढ दिल्यास आठ महिन्यांपासून एकदिवसाड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.