- १५ जागा जिंकून विजयश्री आणली खेचून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- आयटी हब असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला असुन, श्री म्हातोबा परिवर्तन पॅनलने यामध्ये विजय मिळवला आहे.
त्यांचे एकूण १५ सदस्य निवडून आले असुन, त्यापैकी तीन जण बिनविरोध झाले आहेत. तर, श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे, यातील एक जागा बिनविरोध आहे.
श्री म्हातोबा परिवर्तन पॅनल (राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना) यांनी एकूण १५ जागांवर आपले सदस्य निवडून आणले. यापैकी, तीनजण बिनविरोध झाले आहेत. तर, श्री म्हातोबा ग्रामविकास पॅनलला (राष्ट्रवादी, शिवसेना) केवळ दोन सदस्य निवडून आणता आले असून, यापैकी एकजण बिनविरोध झालेला आहे.