- महाराजा अग्रसेन ट्रस्टचे उद्घाटन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसें.) :- समाजात चांगल्या कार्याची माहिती लवकर पोहचत नाही. मात्र, वाईट कार्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते, असे सांगत अन्नदान करणे हे श्रेष्ठ कार्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. रुग्णांना मोफत भोजन पुरविणाऱ्या महाराजा आग्रसेन किचन ट्रस्टच्या चिंचवड येथे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अगरवाल फेडरेशनचे उपाध्यक्ष विनोद बंसल, उद्योजक प्रेमचंद मित्तल, अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरणचे अध्यक्ष सुभाष बंसल, भाजपा व्यापारी आघाडीचे शहर उपाध्यक्ष सुधीर आगरवाल, रामअवतार अगरवाल, पन्नालाल गुप्ता, वेदप्रकाश गुप्ता, राजेश आगरवाल, महाराजा अग्रसेन किचन ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी उद्योजक अगरवाल, विनोद गोयल, विजय गोयल, जगदीश गोयल, रामशरण गुप्ता, भगवानदास आगरवाल, कमलनाथ बंसल, प्रेमप्रकाश गोयल, विजय सिंघल, रोहित गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते एम. ए. हुसैन. यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींना सन्मानित केले.
नामदार बापट पुढे म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी अगरवाल समाजाने पुढाकार घ्यावा. व्यवहार कसा करावा हे आगरवाल समाजाकडून शिकावे. अगरवाल समाज सत्कारणी लागेल, अशा उपक्रमावरच खर्च करतात.
ट्रस्टचे अध्यक्ष सीए कृष्णलाल बंसल म्हणाले की, काही कार्यकर्ते एकत्र येवून (१० ऑक्टोबर १८) रोजी महाराजा अग्रसेन जयंतीच्या दिवसापासून वायसीएम रुग्णालयात हा उपक्रम सुरू केला आहे. रुग्णाना मोफत भोजन पुरवठा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते एम ए हुसैन यासाठी यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. आजतागायत ४ हजार रुग्णांनी लाभ घेतला आहे. भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी सचिव मुकेश अगरवाल, खजिनदार संजीव आगरवाल यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के एल बंसल तर आभार संजीव अगरवाल यांनी मानले.












