- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२१) :- राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांतील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपर्यंत ५० टक्के उपस्थितीत वर्ग चालवून नंतर उपस्थिती वाढविण्यात येणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. शाळा सुरू झाल्या पण महाविद्यालय नाहीत, ही बाब विसंगत असल्याचे कुलपती व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच म्हटले होते.
१ फेब्रुवारीला सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेत महाविद्यालये सुरू करण्याबाबत भूमिका निश्चित केली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत बैठक झाली.