- कामावरून काढून टाकल्याच्या रागातून केले उद्योजकाला ठार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२१) :- चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून हा खून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारानेच केला असल्याचं समोर आलं आहे.
मुख्य आरोपीला दीड वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होतं. त्याचा राग मनात धरून आनंद उनवणे यांचे इतर चार जणांच्या मदतीने अपहरण करण्यात आले होते व त्यानंतर धावत्या मोटारीत दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल २ हजार सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी केल्याचंही समोर आलं आहे. मात्र अद्याप मुख्य सूत्रधार आरोपी प्रभू पुजारी हा फरार असु, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी उमेश सुधीर मोरे, बाबु ऊर्फ तुळशीराम नथुराम पोकळे, सागर दत्तात्रय पतंगे, दिपक धर्मवीर चांडालिया यांना अटक करण्यात आली असून, अपहरणातील सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.