- भाजपविरोधात शहर कॉंग्रेसचा तहसील कचेरीवर मोर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२१) :- देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कॉंग्रेसची महत्वपुर्ण भुमिका आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची शेती आणि औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी कॉंग्रेसने केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले.
पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रासह देशभरात स्वातंत्र्योत्तर काळात पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे महत्वपुर्ण योगदान आहे. समाजातील सर्व घटकांनाबरोबर घेऊन कॉंग्रेसने देशाचा विकास केला. आता भारत देश भकास करण्याचे काम भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार करीत आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.
गुरुवारी (दि. २५) रोजी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी म्हाळसाकांत चौक ते तहसिलदार कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी महापौर कवीचंद भाट, पिंपरी चिंचवड युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितूले, माजी नगरसेवक विश्वास गजरमल तसेच सज्जी वर्की आदी उपस्थित होते. मोर्चानंतर तहसिलदार कचेरी बाहेर सभा घेण्यात आली. या आंदोलनानंतर तहसिलदार गीता गायकवाड यांना डॉ. कैलास कदम आणि प्रतिनिधींनी निवेदन दिले.