- लग्न समारंभास ५० व्यक्तींची मर्यादा..
- शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२२) :- राज्य सरकारने कोरोना आणि ओमायक्रॉन संसर्गाच्या अनुषगाने राज्यात नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी पासून हे नवे निर्बंध लागू होणार आहेत.
रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही. लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीची परवानगी. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना उपस्थित राहता येणार. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार.
शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार. यात केवळ १० वी, १२ वीच्या बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा इतर सरकारी शैक्षणिक विभागांकडून आयोजिक नियोजित कृतिकार्यक्रमाला अपवादात्मक स्थितीत परवानगी असणार. जलतरण तलाव, व्यायामशाळा, सौंदर्य प्रसाधनगृह बंद राहणार. केशकर्तनालये ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, मात्र करोनाबाबच्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार. याशिवाय दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे.