न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- चिखलीतील पाटीलनगर येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात लोकांची गर्दी जमवून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता बुधवारी (दि. २) सकाळी बैलगाडा शर्यत आयोजित केली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आरोपींनी पालन केले नाही. नियम २०१७ मध्ये दिलेल्या नियमानुसार बैलगाडा शर्यतीचे आयोजन न केल्यामुळे पोलीस शिपाई बाजीराव चौधरी यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार राजू नेवाळे, सारंग मोरे, दीपक साने, रवींद्र जाधव आणि इतर १० ते १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम मस्के तपास करीत आहेत .