न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२२) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शहरात एकही कॉपी बहाद्दर सापडला नसल्याने ही समाधानाची बाब आहे.
शहरातील मुख्य केंद्रे ४५ तर ९५ उपकेंद्रांच्या माध्यमातून दहावीच्या २० हजार ७०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. संपूर्ण राज्यात यंदा ९९ तर पुण्यात १३ कॉपी बहादर आढळून आले आहेत. करोनामुळे मागील वर्षी परीक्षाच झाल्या नव्हत्या. यंदा करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथे परीक्षा केंद्राची व्यवस्था केली होती. दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू झाली असून ती ४ एप्रिल रोजी संपली. राज्यात परीक्षांमध्ये यावर्षी कॉपीसारख्या गैरमार्गाांचा अवलंब विद्यार्थ्यांनी केला असल्याचे उघड झाले आहे. मात्र, ही संख्या खूप कमी आहे. गैरमार्गाांना आळा घालण्यासाठी भरारी पथकेही नियुक्त केली होती. पिंपरी चिंचवड शहरात दहावीच्या परीक्षेमध्ये एकही कॉपी बहाद्दरआढळला नाही. शिक्षण विभागाचे
उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, शहरातील दहावीच्या परीक्षा शांततेत पार पडल्या. कॉपीसारखे प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात भरारी पथके तैनात केली होती. त्यामुळे पिरी – चिंचवड शहरातील एकाही केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळून आला नाही.