न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे २०२२) :- नदी घाटावर जेवण करताना दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाच्या रागातून आरोपींनी इसमाला जबर मारहाण केली. त्यानंतर कशाच्या तरी साहाय्याने गळा आवळून त्याचा खून केला. त्याचा मृतदेह इंद्रायणी नदी घाटाजवळील संत गुलाबराव महाराज ट्रस्ट शेजारील पदपथावर आढळला.
हा प्रकार रविवारी (दि. ८) साडेनऊ ते सोमवारी (दि. ९) सकाळी नऊ या कालवधीत आळंदी येथे घडला. दीपक (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधव साबळे (वय ३०, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी, मूळ मु. पो. जावअध, ता. सेनगाव जि. हिंगोली), सुधाकर ऊर्फ बंटी बबन वाघमारे (वय ३०, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी, मूळ हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद), ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय ५६, रा. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी मूळ हाइलकी, ता. अहमदपूर जि. लातूर) यांना दिघी पोलिसांनी आरोपींना चार तासातच अटक केली.