न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे व सिंधू धर्मपाल तंतरपाळे व माजी नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. १९) देहूरोड आयुध निर्माणी येथे धडक मोर्चा व जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
आयुध निर्माणी देहूरोडपासून २००० यार्ड रेड झोन विकासनगर, किवळे परिसर, रावेत, मामुर्डीपर्यंत लागू करावा, अशी शिफारस अॅम्युनेशन फॅक्टरी देहूरोड यांनी सरंक्षण खाते भारत सरकार यांना केली, ती शिफारस रद्द करुन २७० यार्ड रेडझोन हद करावी, किंवा गरज नसताना लावलेला रेड झोन रद्द करावा, या मागणीचे निवेदन देहूरोड आयुध निर्माणीचे महाप्रबंधक संजीव गुप्ता यांना देण्यात आले.
रेड झोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी हा २००० यार्ड रेड झोन आपण लावू शकत नाही, जास्तीत जास्त २७० यार्ड लावू शकता, तसे कागदपत्र आम्ही तुम्हाला देतो यावर गुप्ता यांनी कागदपत्र बघून निर्णय घेतो व तुमची मागणी वरिष्ठ कार्यालयाला पाठवितो, असे ठोस आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
या प्रसंगी कार्यालय प्रबंधक गौरव माळवी, कर्नल जाधव, कर्नल जयवर्धन, बाळासाहेब तरस, रेडझोन समीतीचे निलेश तरस, राजेंद्र तरस, कुंडलिक आमले, बापूसाहेब कातळे, तुषार तरस, देहूरोड कॅन्टोमेन्टचे नामनिर्देशित सदस्य कैलास पानसरे, माजी नगरसेवक गोपाल तंतरपाळे उपस्थित होते. या आंदोलनात श्याम सिंघवाणी, सुधीर तरस इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनाचे आयोजन पंकज तंतरपाळे यांनी केले. विकास नगर येथील रिक्षा स्टँडजवळ मोर्चाला सुरुवात झाली. बैंक ऑफ इंडिया चौकात मोर्चा आला असता पोलिसांनी मोर्चा अडवला. फॅक्टरीच्या गेटपर्यंत जाऊ दिले नाही. सात लोकांचे शिष्टमंडळ फॅक्टरीच्या गेटवर गेले. येथून इन्स्पेक्शन भवन येथे चर्चा करण्यात आली
रेड झोन किती असावा याबाबत शिष्टमंडळाने आयुध निर्माणीचे जनरल मॅनेजर एस. के. गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली. अभ्यासानुसार ज्या ठिकाणी अत्यंत स्फोटक पदार्थ ठेवले आहेत त्या ठिकाणी ५०० मीटरचा रेड झोन ठेवला आहे. त्या व्यतिरिक्त कमी स्फोटके असणाऱ्या ठिकाणी २७० मीटरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरीचा रेड झोन हा फक्त २७० मीटरचा असावा फार फार तर पाचशे मीटरपर्यंत त्याची मर्यादा असावी, असे सुदाम तरस यांनी समजून सांगीतले या वेळी एस. के. गुप्ता यांनी ही बाब समजावून घेतो. त्यानंतर तुमचे म्हणणे सरकार दरबारी पोहोचवितो, असे सकारात्मक उत्तर दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.