न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- यंदा जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३८ वा पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे होणारे प्रस्थान हे मागील वर्षापेक्षा १० दिवस अगोदरच होत असल्याने वाढत्या उष्णतेच्या पाऱ्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. या करिता प्रशासन व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती सारख्या सामाजिक संस्थांनी वैष्णवांच्या सेवेकरता तत्पर राहने आवश्यक ठरते.
याकरिता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा समितीच्या स्वयंसेवकांची व एस.पी.ओं. ची पोलीस प्रशासनास मोलाची मदत मिळेल ह्यात शंका नाही. १० जून रोजी जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर सूर्यवंशी हे बैठकीत बोलत होते.
पोलीस मित्र, विशेष पोलीस अधिकारी, समिती विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी यांची विशेष बैठक देहूरोड पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस एल आय बी विभागाचे अजित सावंत, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय पाटील, राज्य संपर्क प्रमुख विजय मुनोत, निगडी देहूरोड विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, आकुर्डी गंगानगर प्रमुख संतोष चव्हाण,पुणे विभागीय प्रमुख नाना कुंबरे, जयेंद्र मकवाना,सुनिल सुतार, राहुल जाधव, संदीप जाधव, राजू निबुदे,प्रविण जोंधळे, राहुल लुगडे हे उपस्थित होते.
या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या २० वर्षांपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एसपीओ ,पोलीस मित्र, स्वयंसेवक पोलीस प्रशासनास पालखी बंदोबस्तासाठी सहकार्य करीत आहेत. पालखीची सुरक्षा करण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या वारकरी भक्तांची सेवाभावी मदत करण्यासाठी समितीचे १२० सदस्य यंदाच्या वर्षी पूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी असणार आहेत. कडक उन्हाची शक्यता गृहित धरून समितीने पांढऱ्या रंगाच्या टोप्या, सुती उपरणे यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
बैठकीचे नियोजन एल आय बी चे सावंत यांनी केले. सूत्रसंचालन विशाल शेवाळे यांनी केले. प्रास्ताविक विजय मुनोत यांनी केले. आभार प्रदर्शन नाना कुंबरे यांनी केले.












