न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२३) :- मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने या महामार्गावरील वाहतूक १५ ते २१ जुलै दरम्यान रात्री १२:३० ते पहाटे ३:३० पर्यंत बंद राहणार आहे.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी केले. तसेच एक्स्प्रेस-वे, तळेगाव टोल नाका, मुंबई-पुणे जुना महामार्ग, सोमाटणे टोल नाका येथे अवजड वाहने थांबविण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे व मुंबई-पुणे जुना महामार्ग येथून येणारी हलकी वाहने भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे व चांदणी चौक विया हॉटेल या मार्गाने कान्रजकडे वळविण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व मुंबई-पुणे जुना महामार्ग व किवळे ब्रिज ते राधा चौक या दरम्यान येणारी अवजड वाहने ही भुजबळ चौक, राजीव गांधी ब्रिज मार्गे सोडण्यात येणार आहेत.