- योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑगस्ट २०२३) :- महाराष्ट्र सरकारने जीएसटी पूर्व कायद्यांतील थकबाकीदारांसाठी “अभय ‘योजना’ जाहीर केली आहे. त्यामुळे जुन्या थकबाकीच्या जोखडातून लाखो व्यापारी मुक्त होणार आहेत. पूर्वीच्या कायद्यांच्या थकबाकीदारांच्या त्रुटी दूर व्हाव्यात, यासाठी अनेक तरतुदी थकबाकी माफही केली असल्याचे कर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांनी केले आहे.
काय आहे योजना?
या योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड’ असे आहे. या अंतर्गत रकमेचा भरणा ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करायचा आहे. यापूर्वीच्या योजनेत १० हजार रुपयांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ होती. ती रक्कम वाढवून आता २ लाखांपर्यंत केली आहे. त्याचा लाखो व्यापा-यांना फायदा होणार आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात ?
■ ज्यांची थकबाकी ५० लाख रुपये किवा त्यापेक्षा कमी असेल, अशा व्यापा-यांना सरसकट एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरण्यास पर्यायदेखील उपलब्ध केला आहे. अशी ठोक २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेला माफी देण्यात येणार आहे. मागील वर्षी हा पर्याय दहा लाख रुपयांपर्यंत होता.
■ ज्या व्यापा-यांची एका आर्थिक वर्षाची थकबाकी ५० लाख रुपयाहून अधिक आहे. अशा व्यापा-यांना अभय योजनेंतर्गत भरावयाच्या आवश्यक रकमेसाठी हप्ते सवलतीचा पर्याय दिला आहे. त्याची मुदत ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे. ही सवलत ४ भागात आहे. पहिला हप्ता २५ टक्के रकमेचा असून, ऑक्टोबरपर्यंत भरावयाचा आहे. उरलेले तीन हप्ते पुढील ९ महिन्यांत भरणे आवश्यक आहे. राज्य सरकारने २० मार्च २०२३ पासून नवीन कायद्याच्या तरतुदी लागू केल्या. जुन्या थकबाकीदारांना अभय योजनेद्वारे लाभ घेता येईल.
हप्ते भरण्यास विलंब झाल्यास १२ टक्के दराने व्याजाची आकारणी होईल. जर सर्व हप्ते नऊ महिन्यांच्या कालावधीत दिले नाहीत म्हणजे आवश्यक रकमेपेक्षा कमी भरणा केल्यास व्यापा-याला प्रमाणशीर लाभ देण्यात येतील. कमी पैसे भरले म्हणून अर्ज फेटाळण्यात येणार नाही. भरलेल्या रकमेच्या प्रमाणात त्याला माफी नक्की मिळेल. – रेश्मा घाणेकर, राज्य कर सहआयुक्त ३, पुणे…