न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२४) :- शिक्षण हक्क कायदा (आर. टी. ई) संदर्भात शिंदे सरकारने घेतलेल्या चूकीच्या व अजब निर्णयाच्या विरोधात रविवारी (दि. १८) रोजी आकुर्डीत आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांची पालकांसोबत बैठक झाली.
यावेळी चेतन बेंद्रे म्हणाले, राज्य सरकार आर. टी. ई च्या प्रक्रियेमधून खाजगी विनाअनुदानित शाळांना काढत आहे. त्यामुळे आर. टी. ई फक्त नावालाच उरणार आहे. नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक शाळा या खाजगी विनाअनुदानित आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. जे विद्यार्थी प्रवेश घेतात ते अर्थिक, वंचित घटकातून येतात. या निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यापासून वंचित राहतील. तसेच मागील काही वर्षांमध्ये ज्यांचे प्रवेश झाले आहेत त्यांचे प्रवेशसुद्धा धोक्यात येऊ शकतात. पालकांचे अर्थिक शोषण होणार आहे.
सरकारच्या या धोरणाविरोधात गुरुवारी सकाळी दहा वाजता निगडी येथील अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याट येणार असल्याची माहिती बेंद्रे यांनी दिली.