- माजी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- महापालिकेच्या नागरवस्ती विभागातील कल्याणकारी योजनांचा मोबदला मिळण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांना महापालिका वेठीस धरत आहे. निधीची आवश्यकता असताना लाभार्थ्यांना ती वेळेत मिळत नाही. लाभार्थी मदतीपासून वंचित राहतात.
दरम्यान सद्यस्थितीत सर्व शालेय विध्यार्थांचे निकाल लागले आहेत. परंतू, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्याचबरोबर आता विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०२४ मध्ये येवू घातल्या आहेत. पुन्हा विधानसभेची आचारसंहिता. या सर्व प्रक्रियेत गरजू लाभार्थी प्रक्रियेबाहेर जातो. त्यांना अपेक्षित आर्थिक मदत मिळत नाही.
तसे होऊ नये यासाठी पालिकेने या योजनांचे अर्ज नागरीकांपर्यंत वेळेत पोहचवावेत. त्यासाठी लागणारी सर्व पूर्वतयारी वेळेत करून घ्यावी आणि लाभार्थ्यांना वेळेत मदत करावी, अशी मागणी माजी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.