- महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या वतीने स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२४) :- कष्टकरी, गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी आपले आयुष्य वेचणार्या अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त चिंचवड येथील अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कामगार नेते तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, जन.सरचिटणीस प्रवीण जाधव, उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, सचिव सर्जेराव कचरे, मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कदम, रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश कंठाळे, संघटनेचे खजिनदार नागेश व्हनवटे¸ गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे,¸ पांडुरंग काळोखे, संपत मांढरे, श्रीकांत मोरे, अशोक साळुंखे, बबन काळे, समर्थ नाईकवाडे, अमित पासलकर, अविनाश जांभळे, नाना नाईकवाडे, ज्ञानेश्वर घनवट, गिरीश देशमुख, चंद्रकांत पिंगट, सोमनाथ फुगे, सोपान गाडगे, सतीश शिंदे, धुळा शेंडगे, रोशन दोलताडे, सुनिल माने, ज्ञानदेव पाचपुते, कैलास तोडकर, जयराम केगार, आयुष शिंदे, रत्नाकर भोजने व असंख्य कामगार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कामगार नेते इरफान सय्यद म्हणाले, आज खऱ्या अर्थाने साहेबाच्या विचाराना प्रमाण मानून कष्टकरी माथाडी-हमाल-मापडी कामगाराकरिता कार्य करणारे सरकार राज्यात प्रस्थापित झाले असून कायद्यात सुधारणा करण्यासाठी आणलेले विधेयक व त्या विधेयकामध्ये सुधारणा करण्यासाठी काही सूचना माथाडी कामगार, संघटना यांना मागविण्यात आल्या व त्याच अनुषंगाने कामगारांनी, संघटनांनी असमाधान व्यक्त केल्यानंतर हे विधेयक थांबवून त्यावर चिकित्सा समिती नेमण्यात आली. हा कष्टकरी कामगारांच्या एकजुटीचा विजय आहे. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी लाखो कष्टकरी माथाडी, मापाडी कामगार यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. पाटण तालुक्यातील मुंदुळ कोळे यागावी जन्मलेल्या अण्णासाहेब यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी मुबई गाठली. मुंबईत आल्यावर तेथे उसाच्या चरक्यावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. नंतर दारुखाणा येथे ओझे उचलण्याची कामे केली. ही कामे करत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, मालकाकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळत असे. त्या तळमळीतून माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा त्यांनी चालू केला. पुढे अनेक राजकीय नेत्यांकडे सरकार दरबारी पत्रव्यवहार पाठपुरावा करून माथाडी कायदा अमलात आणला. त्यामुळे माथाडी कामगारांना न्याय मिळून आज माथाडी संघटन हे एक बलाढ्य संघटन म्हणून नावारूपाला आले. अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब कष्टकरी माथाडी कामगारांच्या करिता केलेलं कार्य हे एका दीपस्तंभ सारखे आहे. माथाडी कामगारांच्या कुटुंबीक, आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल होण्यासाठी स्व अण्णासाहेब पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. त्याचे कार्य नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. सध्या माथाडी मध्ये काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मुळे माथाडी कामगार व कायदा बदनाम झाला आहे. गाव खेड्यातून आलेला आमचा माथाडी कामगार कधीही दादागिरी करीत नाही. प्रामाणिकपणे काम तो करुन श्रमाचा मोबदला मागतो. चुकीचे लोक माथाडीच्या नावाखाली कंपनी व्यवस्थापनाला व माथाडी कामगारांना वेठीस धरतात. परंतु त्यात आपला गोरगरीब कष्टकरी कामगार भरडला जात आहे. यासाठी सर्व कामगारांनी एकजुटीने समस्यांवर लढा उभारला पाहिजे. उद्योग टिकले तरच कामगार टिकेल. असे मत इरफान सय्यद यांनी व्यक्त केले.












