- कुदळवाडीत दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेचे अर्ज वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास ते उद्याचे भविष्य अधिक प्रकाशमान करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधी यांनी मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे, असे मत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी मंगळवारी व्यक्त केले.
कुदळवाडी येथे १० वी व १२ वी च्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले. यावेळी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव बोलत होते. कार्यक्रमाला मुरलीधर ठाकूर, काका शेळके ,गणपत येरोळे साहील मुजावर, राजेंद्र टेकाळे आदी उपस्थित होते.
दिनेश यादव म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, चांगल्या शैक्षणिक सुविधा, साहित्य पुरवणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही राज्यात अव्वल आहे. शिक्षणावर सर्वाधिक तरतूद करणारी ही महापालिका आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वसामान्य कामगार, कष्टकरी वर्ग राहत असून, या सर्वांच्या पाल्यांना महापालिकेमुळे सर्वोत्तम शिक्षणाची आज सोय झाली आहे. त्यादृष्टीने आज दहावी व बारावी मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेचे फॉर्म वाटप केले.
या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी या पुढील काळात चांगले शिक्षण घ्यावे असा हेतू आहे. या अर्थसहाय्यातून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नक्कीच आधार मिळणार आहे, असा विश्वासही दिनेश यादव यांनी व्यक्त केला आहे.