न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- १५ ऑक्टोबर हा जगभरात ‘जागतिक अंधदिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने नेत्रतज्ञ डॉ. अभिजित आग्रे यांनी नेत्रदानाबद्दलचे समज-गैरसमाजाबद्दलचे महत्व विषद करताना म्हणाले कि, आज देशभरात १२ ते १३ लाख बुबळांची गरज आहे. त्याच्या तुलनेत ३० ते ४० हजार बुबळे जमा होतात. यापैकी निम्मे बुबळं वापरण्याजोगे असतात. शासन आणि सामाजिक संस्थांकडून जनजागृती होऊन देखील नागरिकांमध्ये नेत्रदानाबदल उदासीनता आहे.
केवळ नेत्रदाना चा अर्ज भरून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. नेत्रदानाचा अर्ज भरणे म्हणजेच आपल्या सोबत अजून एक व्यक्तीला नेत्रदानास प्रवृत्त करणे आहे. ‘आयुष्यात येता जाता श्रमदान, जगता जगता रक्तदान, जाता जाता नेत्रदान, आणि गेल्यावर देहदान’ केले पाहिजे.
जागतिक अंधत्वाच्या समस्येवर भर देण्यासाठी जागतिक अंध दिन साजरा केला जातो. अंधत्व टाळण्यासाठी आणि उपचारांबद्दल जगभरातील सार्वजनिक जागरुकता वाढवण्याचा हेतू आहे. जगभरातील ३७ दशलक्ष लोक अंध आहेत, १५ दशलक्षांहून अधिक भारतात आहेत. यापैकी ७५% टाळता येण्याजोगे अंधत्व आहे. गेल्या आठवड्यात प्रकाशित एका नवीन अभ्यासानुसार, वैज्ञानिकांनी आमच्या फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपद्वारे निळ्या प्रकाशामुळे दृष्टीदोषांची संधी वाढू शकते. निळा प्रकाश दृष्टीस हानीकारक आहे.
डोळ्याच्या पेशींवर चमकणारा निळा प्रकाश महत्वाच्या रेणूंना सेल-होलींग बदलतो ज्यामुळे संबंधित मॅक्यूलरची कार्यक्षमता कमी (macular degeneration) होऊन अंधत्व येऊ शकते. जागतिक पातळीवर दृष्टीदोषांची प्रमुख कारणे चष्म्याचा नंबर, काचबिंदू, मधुमेहमुळे रेटिनोपॅथी आणि मोतीबिंदू आहेत. डोळ्यांच्या अपघातमुळे अंधत्व यऊ शकते. जगभरातील सर्व दृष्टीदोषांमधील ७५ % अंधत्व टाळण्यायोग्य दृष्टीदोष आहेत
दृष्टिदोष असणा-या बहुतेक लोक ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. टाळण्यायोग्य अंधत्वाच्या मुख्य कारणांवर उपचार केला जाऊ शकतो किंवा अंधत्वाच प्रतिबंध केला जाऊ शकतो.















