- रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक – बाबा कांबळे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. २७) रोजी मुंबईतील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन व कामगार विभागाचे संबंधीत वरीष्ठ अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत रिक्षा चालकांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परिवहन खात्याच्या अंतर्गत रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, जिल्हानिहाय लोकसंख्येच्या आधारावर रिक्षा परवाने, परमिट देण्यात यावे. ओला-उबेरच्या बाबतीत कोर्टात केस सूरू असून, सरकारचे वतीने अभ्यासपूर्ण बाजू मांडून ओला-उबेर बाबत नियमावली कठोर करण्यात यावी, खासगी ऑटो-रिक्षासह जीप, मॅजिकमधून होणारी बेकायदा वाहतूक राज्यातून संपूष्टात आणण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात यावे, प्रादेशिक परिवहन समितीवर जिल्हानिहाय ऑटोरिक्षा चालकांचे प्रतिनिधी अशासकिय सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशा विविध विविध मागण्या संघटनेने यावेळी बैठकीत केल्या.
कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले की, कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर (नागपूर), महासचिव बाबा कांबळे पूणे, उपाध्यक्ष प्रमोद घोणे (मुंबई), गफारभाई नदाफ (कराड) यांचे नेतृत्वाखाली व संघनेच्या वतीने रिक्षाचालकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत. रिक्षाचालकांच्या प्रश्नाबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सकारात्मक तोडगा काढून, रिक्षाचालकांना न्याय देणार असल्याचे आश्वासन बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
या बैठकीस आनंद चौरे (नागपूर), सुरेश गलांडे, फिरोज मुल्ला (सांगली), महेश चौगुले, आरिफ शेख (मिरज), ईलियास लोधी (अकोला), नरेंद्र वाघमारे (कामठी), मारूती कोंडे (नवी मुंबई), प्रल्हाद सोनवणे (जळगाव), महीपती पवार, राजू पूजारी (सोलापूर), किशोर खरताळे, संजय गांगुले
(नाशिक), विक्की तामचिकर, विनोद वरखडे (पिंपरी चिंचवड) आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी रिक्षा चालकांच्या प्रश्नाबाबत लक्ष घालून प्रश्न सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न केल्याबद्धल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, अशी माहिती कृती समिती महाराष्ट्र सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.