न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२०) :- देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत. हे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारावेत, असे आवाहन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव यांनी केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतन प्रशालेत भारताच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या क्रांतीकारकांना व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांप्रति श्रद्धांजली वाहिली.
शिक्षिका शिल्पा पालकर यांनी हुतात्मा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्या म्हणाल्या, देशाचा स्वातंत्र्यदिन जितक्या उत्साहात आपण साजरा करतो, ते या बलिदान केलेल्या हुतात्म्यांमुळेच.