न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२०) :- विचार, आचार, संस्कृती यांचे महत्व विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन जीवनातच मिळाले पाहिजे. व्यक्तींची सामाजिक, वैचारिक, तात्विक बैठक याच वयात तयार होत असते. यातूनच सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडतात. विद्यार्थी भविष्यात ‘जबाबदार, सुसंस्कृत नागरिक’ झाले पाहिजेत. त्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन, सहल आणि विविध प्रकारच्या श्रम व संस्कार शिबीरातून त्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. हभप सुभाष महाराज गेठे यांनी केले.
भोसरीतील संत साई इंग्लिश मिडियम स्कुलच्या वार्षिक स्नेह संमेलनात ते बोलत होते. यावेळी भिक्षेकरी सेवा संघाचे डॉ. अभिजित सोनवणे, मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर, लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, उमा चंदने, नामदेव फापाळे, भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठल वाळुंज, देवराई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे, अजित फापाळे, सुनिता ढवळेश्वर, पालक संघाचे अजित मेदनकर, हरेश पटेल, माजी विद्यार्थी सृष्टी हनुमंत लोढे, तन्मय संतोष डुंबरे, अक्षदा संजय तिवाटने, ऋतीक सुनिल निकम, आयुश्री मानस मोहंती, सोहन रविंद्र भाकरे, मुक्ता रमेश बिराजदार, नवनंद अजयन मट्टणकोट आदी उपस्थित होते. राजनंदिनी घोरपडे, संस्कृती कबाडी, ओम तापकीर, अभिषेक राणे या विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व स्वाती मोघे, अकिला सय्यद, संगिता पाटील, प्रमोद शिंदे, काशीनाथ कत्नळी, स्वाती गोसावी, मनोज वाबळे, भागवत वानखेडे, भारती ढवळेश्वर या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
हभप गेठे महाराज म्हणाले की, हे वर्ष ज्येष्ठ साहित्यिक पु.ल.देशपांडे, गीतरामायणकार ग.दि.माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके, मनशक्ती केंद्राचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद यांच्या जन्म शताब्दीचे वर्ष आहे. त्यानिमित्त या स्नेह संमेलनात या साहित्यिकांना मानवंदना देऊन सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम साजरे झाले. ही शाळेचे मुख्याध्यापक शिवलींग ढवळेश्वर यांची संकल्पना विचार, आचार, संस्कृतीचे महत्व सांगणारी आहे.
या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी ती गीत रामायण, फुलराणी, वंद्य वंदे मातरम, जन्मदाते हो संस्कारदाते व्हा, सणांचे महत्व, पोवाडा, मनशक्तीचे महत्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम, मुली वाचवा, मोबाईलचा अतिवापर, हिल द वर्ल्ड – माइकल जॅक्सन, राणी आणि प्रधानाचा संवाद अशा विविध नाटिका, नृत्य सादर केली. विठ्ठल वाळुंज यांनी गड, कोट, किल्ल्यांचे व पर्यावरणाचे महत्व सांगितले. धनंजय शेडबाळे यांनी मानवाच्या उत्क्रांतीमध्ये व अधोगतीमध्ये वृक्षांचे महत्व आणि डॉ. अभिजित सोनवणे यांनी भिक्षेक-यांना कष्टकरी कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
सुत्रसंचालन मुक्ता बिराजदार, स्मृती पैलकर यांनी केले. आभार रचना भुसाळे, वैष्णवी चांदोरे यांनी मानले. आयोजनात खुशी गदिया, ओम फुगे, निरज पालवे, जोहरा मोकाशी, आरती कामथे, मनोज वाबळे, रुपाली खोल्लम, सुमित्रा शेट्टी, मालन लिगाडे, तेहमिन तेहसिलदार, विठ्ठल पुंडे, प्रमोद शिंदे, गौरी शिंदे, कांचन शिंगोटे, भागवत वानखेडे, सुहासिनी बदोले, हेमा मोहरे आदींनी सहभाग घेतला.