न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येवून शिवजयंती संस्थेच्या विशेष सहकार्याने साजरी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. जयश्री मुळे, प्रा. प्रल्हाद गोगरकर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा नृत्य नाटीकेद्वारे सादर केला. तसेच कार्यक्रमानंतर मिरवणूक काढण्यात आली. त्यात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, व्याख्याते अजित काळोखे पुढे म्हणाले, ३०० वर्षे महाराष्ट्र परकीयांची गुलामगिरी भोगत असताना मात्र, भूमिच्या स्वातंत्र्यासाठी जुमली राजवटीविरुद्ध लढा दिला. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे पूर्ण झाली. तरीसुद्धा महापुरुषांचा जाती-पातीत वाटून घेतले आहे. काही आंधळ्या भक्तांनी तरुणाईला जातीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुणांनी एकत्र येत या जाती-पातीच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. आपणच आपल्या देशाचे तुकडे करीत आहोत, अशी खंतही यावेळी व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राष्ट्रप्रेमी व राष्ट्रद्रोही या दोन जाती होत्या. ते धार्मिक होते, पण धर्म भोळे नव्हते. सर्व जाती-धर्मांचा समान आदर करीत होते. त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविणारे वास्तववादी राजे होते. आज तीन वेळा शिवजयंती साजरी होते, याबाबत तरुणांनी वाचन करून बोध घेण्याची आवश्यक आहे. तरुण पिढीच देशाचे भवितव्य घडवेल, असे ते म्हणाले.
संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, प्रत्येक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले पाहिजे. त्यांनी केलेली कृती व वृत्ती प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. त्यांनी कधीही जाती-पातीचे राज्य आपल्या कारकीर्दीमध्ये केलेले नाही. राजेंना मॅनेजमेंट गुरु असे संबोधले. आजच्या युवापिढीत प्रचंड ताकद, उत्साह, क्षमता व भक्ती आहे. फक्त योग्य वापर व उपयोग झाला पाहिजे.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.प्रल्हाद गोगरकर यांनी केले. परीचय विद्यार्थी अशोक बन्सल यांनी तर, सूत्रसंचालन ऋतूजा गोखले, ईशा राखी यांनी केले, आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.