न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून गुरुवार (दि. १५) रोजी अपहरण केलेल्या मुलीची आरोपींच्या तावडीतून सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उधारी भागवण्यासाठी दोन मित्रांनी अपहरणाचा कट रचला होता. नितीन सत्यवान गजरमल (२५, देवगाव, ता. परंडा, जी. उसमनाबाद, सध्या रा. नेरे) आणि जितेंद्र पप्पूराम बंजारा (२१, रा. थेरगाव, वाकड) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
काही दिवस या दोघांनी पाळत ठेवून १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण केले. त्यानंतर चार-पाच तासानंतर मुलीच्या पालकांना फोन करून पन्नास लाखांची खंडणी मागून पंधरा लाखांवर तडजोड केली. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास उदयोगनगर, चिंचवड येथिल क्वीन्सटाउन सोसायटी शेजारील एका दुकानासमोरून माही जैन निवासी हिचे अपहरण केले होते.
स्थानिक पोलीस, वाकड, पिंपरी, निगडी, चिखली, पिंपरी पोलीस ठाण्याची तपास पथके, गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना झाली. मुंबईला जाणाऱ्या रस्तावरील सर्व टोल नाक्यावर माहिती देऊन अलर्ट करण्यात आले. शहरात जागोजागी नाकाबंदी करण्यात आली, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले, शहरातील लॉज तपासले गेले. शेवटी सूत्रांकडून अचूक माहिती मिळली पोलीस सावधगिरीने आरोपी नितीन गजरमलच्या घरी गेले व त्या मुलीची सुखरूप सुटका केली.
पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक सुधीर अस्पत, उत्तम तांगडे, सुधाकर काटे, प्रभाकर शिंदे, विश्वजित खुळे, डॉ. विवेक मुगळीकर, सतीश माने यांच्यासह सहायक निरीक्षक सतीश कांबळे, पाटील, अभिजित जाधव, उपनिरीक्षक विठ्ठल बढे, चाटे, हरिष माने, हर्षल कदम यांच्यासह इतर पोलीस यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून काही तासातच हि मोहीम फत्ते केली, त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.