न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२०) :- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात २५ टक्के तरतूद करणे बंधनकारक आहे. तसेच तो निधी इतर कामांसाठी खर्च करू नयेत, असे निर्देश असतानाही पालिकेने २०१५-१६ पासून हा निधी खर्च केलेला नाही.
याबाबत पर्यावरण मंत्रालयाने पालिकेकडे खुलासा मागविला आहे. महापालिकेकडून २०१५-१६, २०१७-१८ तसेच २०१८-१९ या आर्थिक वर्षात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठीचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे शहरातील प्रदूषणात भर पडली. याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे खुलासा मागविला होता.