न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ६ डिसें) :- उन्नती सोशल फाऊंडेशनच्यावतीने पिंपळे सौदागर येथील महापालिकेची आण्णासाहेब मगर माध्यमिक विध्यालायातील १२९६ विद्यार्थी व प्रत्येकी एक पालक यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. सुमारे रुपये ३८ कोटी ८८ लाख एवढे विमा संरक्षण लाभ घेता येणार आहे. अपघाती विमा पॉलिसी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे यांनी माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, आनंद हास्य क्लबचे सचिव राजेंद्र जयस्वाल, कांचन काटे, सुवर्ण काटे, विवेक भिसे, यश राक्षे, गजानन देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, तसेच राजकीय सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित होते.
विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या की, महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्याच्या पालकांची परिस्थिती बेताची असते तसेच अनेक पालकांची कोणत्याही प्रकारचे विमा किंवा मेडिक्लेम नसतो. त्यामुळे एखाद्या विध्यार्थ्यांचा अपघात झाला तर, पालकांना हजारो रुयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शहरातील सर्वच शाळांनी विध्यार्थ्याचा अपघाती विमा काढणे काळाची गरज आहे.
त्यासाठी महापालिका प्रशासनाने यासाठी प्रयत्न करावेत. या अपघाती विम्यात विध्यार्थ्यांना अपघात झाला तर रुपये २५ हजार रुपये रुग्णालयातील खर्च मिळणार आहे. विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास पालकांना एक लाख तर पालकांचा मृत्यू झाल्यास तो पाल्य शिक्षणापासून वंचित राहू येऊ नये, म्हणून त्या पाल्यास रुपये २ लाख मिळणार आहेत. तसेच पिंपळे सौदागर मधील सर्वच शाळेतील विध्यार्थ्यांना अपघाती विमा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे शहरातील महापालिका शाळेसह खाजगी शाळा चालकांनी देखील या स्वरूपाचा अपघाती विमा काढणे काळाची गरज आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता इसकांडे व माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी पराग मुंडे व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. आर. एच. डी. हेल्थकेअरच्या संचालिका म्हणाल्या, सध्या राज्यासह देशात अपघाती विमा करणाऱ्या भरपूर कंपन्या आहेत मात्र ही एकमेव कंपनी अशी आहे की, सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा आर्थिक बजेटमध्ये अनेक सुविधा देण्यात येत आहेत, यात नर्स व रुग्णवाहिका, आरोग्य तपासणी, प्रथम उपचार यासह अनेक सुविधा देण्यात येत असल्याने नागरिकांनी देखील हा अपघाती विमा करावा.
कार्यक्रमाची प्रस्तावना आण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका कविता चव्हाण यांनी केले, अंकुश इंगवले यांनी सर्वांचे आभार मानले.