- देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी छत्रपतींचे कार्य सदैव प्रेरणादायी – श्री. अमोल भागवत..
- चिखलीतील आयआयबीएम कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचं रानं केलं. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. वयाच्या केवळ २९ व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे धार्मिक धोरणासंबंधी किती उदारमतवादी होते, हे प्रत्येकाने कधीही नजरेआड करून चालणार नाही. तेव्हा त्यांची आदर्श गुणवैशिष्ट्ये ही प्रत्येकाने घ्यावीत, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलराव बढे यांनी केले.
चिखलीतील आयआयबीएम कॉलेजमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात व शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यावेळी शिवकालीन पोवाडे, व्याख्यान यांचे उत्तम सादरीकरण केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, विभागप्रमुख अमोल भागवत, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, फ प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक कुंदन गायकवाड, स्वि. नगरसेवक सागर हिंगणे, युवानेते पांडाभाऊ साने, चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठलराव बढे, स्वी. नगरसेवक संतोष मोरे, जितु यादव, विकास साने, संदीप शेलार, विनायक आबा मोरे, यश दत्ता काका साने, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मळेकर, कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, प्रशासक संतोष घाडगे, कु. प्रेरणा कनावजे, अनिकेत बिचुकले आदी मान्यवर उपस्थित होते.
विभागप्रमुख अमोल भागवत म्हणाले, अबाल वृध्दांना छत्रपती शिवाजी महाराजांमुळे उर्जा प्राप्त होत असते. सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांची बंधने झुगारून भारत देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्याला सदैव प्रेरणा देत असते. संस्थेतील युवा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ज्ञानार्जन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचा विद्यार्थी यश आढळराव, प्रीती थेंग, कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख अमोल भागवत, तर, आभारप्रदर्शन प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांनी केले.