- त्या कचऱ्याची शास्रयुक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची होतेय मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ एप्रिल २०२१):- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना होम आयसोलेशनवर रुग्णांनी भर दिलेला आहे. मात्र, त्यांचा घरी उपचार घेताना औषधे गोळ्या इंजेक्शन आणि मास्क असा कचरा विलगीकरण होत नसून हा कचरा सुक्या कच-यांत एकत्रित होऊन कचरा डेपोवर जात आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका परिसरात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत दैनदिन कचरा संकलन आणि कचरा डेपोपर्यंत नेण्याची व्यवस्था केली. शहर परिसरात दिवसाला पन्नास टन कचरा संकलित केला जातो. त्यात जैव वैद्यकीय कचरा साडेपाचशे टन आहे. घंटागाडी कामगारांच्या माध्यमातून शहरातील प्रभागातील कचरा संकलित करून विलगीकरण करून मोशीतील कचरा डेपोत कचरा टाकला जातो. तिथे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध केली आहे. तसेच रुग्णालयीन कचरा उचलण्यासाठी रुग्णालयासाठी महापालिकेने व्यवस्था केली आहे.
नागरिकांकडून थेट मास्क, सॅनिटायजर, औषधांच्या बाटल्या गोळया, इंजेक्शन हे थेटपणे करण्यात एकत्रित करून पालिकेच्या घंटागाडीत टाकले जात आहे. शहरात गृह विलगीकरणात सुमारे २० हजार नागरिक उपचार घेत आहे. शहरातील १३५ रुग्णालये फुल्ल झाल्याने लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले नागरिक घरातच उपचार घेत आहे. त्यांच्याकडील कचरा घरातील कचऱ्यात टाकला जात आहे. पुढे हा कचरा विलग न करताच रस्त्यावर किंवा वापरून झालेले मास्क है दैनंदिन कचऱ्यात जात आहे. त्यामुळे धोका निर्माण शकतो. जैवविविधतेस धोका पोहोचू शकतो. रुणांनी केलेला हा कचरा विलगीकरणासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. रुग्णालयातून बाहेर पडणारा कचरा हा आरोग्यासाठी सर्वात घातक असतो. यामुळे अशा कच – याची विल्हेवाट शास्त्रयुक्त पद्धतीने लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.