- जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑगस्ट २०२१) :- कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. प्रत्यक्ष शिक्षणात खंड पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक जीवनावर होणारा सामाजिक विकास लोप पावत चालला आहे. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वासाची पोकळी निर्माण होत आहे. मुलांच्या बौध्दीक विकासासाठी प्रशासनाने टास्क फोर्स नेमून शहरातील शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी स्टेट इंग्लिश स्कूलचे जिल्हाध्यक्ष संदीप काटे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात काटे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली येथील सुमारे 50 शिक्षण संस्थाचालकांनी त्या-त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शाळा सुरू करण्यासाठी पत्र लिहिली आहेत. कोविड 19 विषाणुजन्य परिस्थितीत राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, कोरोना हा काही समूळ नष्ट होणारा विषानू नसून भविष्यात त्याचा प्रादुर्भाव जाणवणारच आहे. तथापि, कोरोनावर मात करून प्रशासनाने शाळा सरू करण्यास परवानगी द्यावी. शाळेत प्रत्यक्ष शिक्षण मिळत असताना विद्यार्थ्यांच्या मनावर विकासात्मक बाबींचा सकारात्मक परिणाम पडतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनातून त्यांना सामाजिक स्थित्यंतराचा अभ्यास होतो. त्यांच्या बुध्दीची सामाजिक जडणघडण होते. समाजातील असंख्य बाबी त्यांना उलघडून सांगण्यास मदत होते. परंतु, शाळाच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा बदल खंडीत होत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीवर विपरीत परिणाम पडत असून त्यांच्यातील आत्मविश्वास डळडमळीत होत चालल्याचे निदर्शनास येत आहे.
नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी विलंब लागणार आहे. लसींचा तुटवडा पाहता विदयार्थ्यांचे लसीकरण शक्य होईल असे वाटत नाही. त्यामळे ज्या भागातील पॉझीटिव्हीटी रेट कमी आहे, त्या भागातील शाळा सुरू करण्यास काय हरकत आहे ?. सुरूवातीला प्राथमिक शळा सुरू कराव्यात. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सुरू कराव्यात. तत्पुर्वी, शाळेतील शिक्षक व इतर कर्मचा-यांचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. त्यासाठी स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्याच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी काटे यांनी केली आहे.