- निकालात यंदाही मुलींनीच मारली बाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे.
यंदा राज्याचा एकूण निकाल ९९.६३ टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. पुणे विभागाचा निकाल ९९.७५ टक्के लागला आहे.
राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. दहावीसाठी ३० टक्के, अकरावीसाठी ३० टक्के, बारावीसाठी ४० टक्के याप्रमाणे १०० टक्के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला आहे.विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विषयनिहाय संपादीत केलेले गुणाच्या माहितीची प्रिंटही विद्यार्थ्यांना काढून घेता येणार आहे.