- राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी प्रकरणाची दखल घ्यावी – बाबा कांबळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- कोविड १९ मुळे गेली चौदा महिने रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे रिक्षाचालकांचे फायनान्स आणि बँकेचे हप्ते थकले आहेत, घरात खायलाच नाहीये तर हप्ते कुठून भरायचे असा प्रश्न रिक्षाचालकांना समोर निर्माण झाला आहे, अशा परिस्थितीमध्ये बजाज फायनान्स च्या रिकवरी एजंट गुंडांनी अक्षरशः रोज घातला असून रिक्षाचालकांना मारहाण करणे बेकायदेशीरपणे रिक्षा ओढून नेणे असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत, याबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी रिक्षाचालक जात आहेत परंतु पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत अक्षरशा गुंडाराज सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये कायदा-सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा इतपर्यंत हे प्रकरण गेलेला आहे, रिक्षाचालकांच्या थकित हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी थकीत हप्ते पुन्हा नव्याने रीटच शेअर करून घेण्यात यावे अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेले आहे परंतु या मागणीची सरकारकडून दखल घेतली जात नाही.
पुणे येथे फायनान्स कंपन्यांच्या मुंडानी किशोर पवार या रिक्षा चालकास बेदम मारहाण केली यामुळे त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे, असे प्रकार पिंपरी चिंचवाड पुणे शहर सह महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात सर्रासपणे घडत आहेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पोलीस तक्रार दाखल करून घेत नाही. या सर्व प्रकारांवर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लक्ष देऊन हे प्रकरण आटोक्यात आणावे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे मत महाराष्ट्र रिक्षा पंचायात परीक्षा ब्रिगेडचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केले आहे.
बाबा कांबळे म्हणाले रिक्षा विकत घेताना आम्ही ३५ हजार रुपये जीएसटी भरतो रोड टॅक्स व इतर खर्च मिळून ती रक्कम साठ हजारापर्यंत जाते, दरवर्षी रिक्षा पासिंग करताना इन्शुरन्स आणि इतर करपोटी पंधरा हजार रुपये रिक्षाचालक भारतात अशा प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये रिक्षाचालकांचे योगदान आहे, आतापर्यंत सरकारने कधीही रिक्षाचालकांना मदत केलेली नाही परंतु आता आर्थिक अडचणीमध्ये असलेल्या रिक्षाचालक सरकारकडे मदत मागत आहे परंतु सरकारने मात्र दीड हजार रुपये अशी अत्यंत तुटपुंजी मदत केली तीदेखील वेळेत आणि अनेक रिक्षा चालकांना मिळाली नाही, आर्थिक विवंचना ला कंटाळून आणि फायनल कंपन्यांच्या जाचामुळे महाराष्ट्रामधील सहापेक्षा अधिक रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालक आत्महत्या करत आहे हातावर पोट असणाऱ्या या गोरगरीब कष्टकरी जनतेला संकट काळात मदत करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे परंतु मदत तर दूर त्यांना त्रास देणाऱ्या गुंडांवर साधी कारवाई देखील पोलिस करणार नसतील तर मन महाराष्ट्रामध्ये सरकार प्रशासन आणि पोलिस आहेत का नाही असा प्रश्न निर्माण होत आहे, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो या प्रश्नाने तात्काळ दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्रातील विस् हजार रिक्षाचालक-मालक पेटून उठतील आणि सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करतील असा इशारा देखील यावेळी बाबा कांबळे यांनी दिला आहे.