न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- आकुर्डीतील जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील चिपळूण व महाड येथील पूरग्रस्त बांधवाना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठविण्यात आली.
जिजाऊ प्रतिष्ठानच्या आवाहनाला साद देत, परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य जमा झाले. यात धान्य, कपडे, भांडी, चादर, बल्ब, कोलगेट, ब्रश, साबण, मीठ, टिकाऊ खाद्य पदार्थ, स्वच्छतेचे समान आदी वस्तूंचे किट तयार करून नुकतेच हे मदतकार्य कोकणातील बाधित नागरिकांसाठी रवाना करण्यात आले.
या मदतकार्यात प्रतिष्ठानचे सभासद अमोल दाभाडे, अमोल गुंड, गणेश तकमोगे, महेश ढवळे, निलेश शेंडकर, अंजली कडेपवार, आशा आवटे, सरोजा कडेपवार, तुलसी कडेपवार, शुभम कडेपवार, उज्वला चौधरी, रेणुका शिंदे, आदेश गायकवाड, अंजली पंद्री, जान्हवी पवार, निकिता घाडगे, साक्षी मापारी, अरुण मापारी, प्रणय फुगे, प्रवीण दाभाडे, सोनाली जाधव, पवन भाटिया, दिपाली धंदर, जलाल, शैलेश लाहुडकर, शिरीष फुलारी यांनी सहभाग घेतला.