- नागरिकांची पाणीसाठ्यातून मुक्तता करा; रोगराई टाळा..
- समाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांचे आयुक्तांना गाऱ्हाणे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्क्यांच्या आसपास भरले आहे. पाण्याचा विसर्गही सुरु आहे. तरीही पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरातील व पर्यायाने काळेवाडीतील दिवसाआड पाणी कपात रद्द करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.
पवना धरणातून हायड्रोमार्गे काही क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येतेय. काळेवाडी परिसरात अनेक वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. अतिरिक्त पाणी साठवणूकीमुळे साथींच्या रोगांचा फैलाव वाढत आहे.
डासांच्या उत्पत्तीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिवसाआड पाणी कपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा करावा. जेणेकरून रोगराईवर नियंत्रण मिळविण्यास यश येईल व नागरिकांची पाणीसाठ्यातून मुक्तता होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.