- शहरवासियांना नियमित पाणी द्या; अन्यथा मनसे कठोर भुमिका घेईल – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आज जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ ‘दिवसाआड’ पाणी पुरवठा सुरू आहे. तो रद्द करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका भवनावर शहर मनसेच्या वतीने आज मंगळवारी (दि. १६) रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात शहरअध्यक्ष, तथा मनसे गटनेता सचिन चिखले, रुपेश पटेकर, बाळा दानवले, मयुर चिंचवडे, अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, राजु सावळे,
विशाल मानकरी, सुशांत साळवी, सुरेश संकट, निलेश कांबळे, संजय मोरे, सचिन सोनटक्के, अशोक धोत्रे, नारायन पठारे, विजया परदेशी, नितीन चव्हाण,
सुजाता काटे, रवी जाधव, दत्ता देवतरासे, मयुर हजारे, आण्णा कापसे, सुरेश भिसे, काशिनाथ खजुरकर, कृष्षा बिरुणगिकर, सागर शिंदे, साईराम भोसले,
के के कांबळे, आंनद भाकरे, रमेश उकाडे, आशिष चव्हाण, रोहण कांबळे, निलेश नेटके, विद्याताई कुलकर्णी, रणजित ठाकुर, सीमा बेलापुरकर, श्रद्धा देशमुख, सगिता देशमुख, सचिन मिरपगार, नितिन सुर्यवंशी, अनिताताई पांचाळ, वैशालीताई बौत्रे, आकाश सागरे, रवी कोणरकर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे कि, तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. परंतु आजतागायत तो लागू आहे. प्रशासनाची अडचण समजून शहरातील नागरिकांनी पालिकेस सहकार्य केले. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण १०० टक्के भरलेले असतानासुद्धा प्रशासन नागरिकांचा विचार करीत नाही. नागरिकांची ही अडचण समजून आयुक्त या नात्याने आपण १ नोव्हेंबरपासून शहरात सर्वत्रच टप्पाटप्प्याने नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मनसेने आपणाकडे मागणी केली होती. मात्र, या मागणीकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आम्हाला जनतेच्या या मागणीसाठी आज आंदोलन करावे लागले. तात्काळ या मागणीचा पुनर्विचार करून आपण शहरवासियांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा. अन्यथा मनसेला पुढील काळात कठोर भुमिका घ्यावी लागेल.