- वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या ही ४० हजारांच्या घरात असल्याचं पहायला मिळत आहे. याच संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज्यातील जनतेला एक सूचक इशारा दिला असल्याचं दिसून आलं.
दिवसागणित राज्यातील करून विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात जर ७०० मेट्रीक टन पेक्षाही जास्त ऑक्सिजनची मागणी निर्माण झाली तर मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं अजित पवार यांनी बोलून दाखवलं आहे.
तसेच, करोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच घेतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. परंतु रूग्ण संख्या वाढत आहे, बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. त्याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारचा आरोग्य विभागही वेळोवेळी माहिती देत आहे. असं अजित पवार म्हणाले.