- दोघांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२२) :- आकुर्डीतील भालेराव हाईट्स येथील तिरुपती कार्पोरेशन अॅण्ड जीवन संजीवन ग्रुपचा संचालक व अकाउंट मॅनेजर यांनी फिर्यादी यांना त्यांच्या स्वाभिमान फायनान्समार्फत आठ महिला बचत गटामधील ऐंशी महिलांना कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले. खोटे आश्वासन देत बचत गटातील महिलांकडून एकूण तीन लाख ७४ हजार ४०० रुपये घेतले.
तसेच २१ कर्जदारांना वैयक्तिक कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एक लाख पाच हजार रुपये घेतले. तसेच त्या २१ कर्जदारामधील सात कर्जदाराकडून पुढील कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी तीन लाख ८६ हजार ९० रुपये घेत सर्व मिळून देतो, असे सांगत एकूण आठ लाख ६५ हजार ४५० रुपये घेतले. त्यानंतर हे पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरून फिर्यादी व महिला बचतगटातील महिलांची मूळ स्वकम अथवा कर्जाची रक्कम न देता या रकमेचा अपहार केला. यामध्ये फिर्यादी बचत गटातील कर्जदारांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी अभिजित प्रकाश दाभाडे (रा. नवनाथ चौक, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास रघुनाथ बादल (रा. नऱ्हे आंबेगाव, पुणे, मूळ अंधेरी वेस्ट, मुंबई), विलास वामन पाटील (रा. खराळवाडी, कामगारनगर, पिपरी, मूळ रा. धुळे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.