न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२२) :- शालेय शैक्षणिक वर्षाकरिता १६ फेब्रुवारीपासन शिक्षणहक्क कायद्यानुसार २५ टक्के जागेवर विद्यार्थ्यांना मोफत शालेय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. दरवर्षी २५ टक्के प्रवेश होत असतात पण नव्या नियमानुसार ३०-३० च्या दोन तुकड्या ग्राह्य धरून १५ पेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेश होणार नाही हे स्पष्ट केले होते.
त्यानुसार शाळेमध्ये फक्त १५ पेक्षा जास्त विद्यार्थी यांचे प्रवेश होणार नाही याचा अभ्यास केल्यानंतर आरटीईच्या यंदाच्या प्रवेश पक्रियेत सामील होणाऱ्या शाळांची संख्या कमी होऊन प्रवेश क्षमता घटणार होती. त्यामुळे पालकाचे स्वप्न भंगणार होते. अखेर पालकांच्या विरोधामुळे शिक्षण संचालक यांनी सन २०२२-२३ च्या आरटीई प्रवेशाची नवीन लागू केलेली १५-१५ प्रवेशाची अट रद्द केली.
शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शहरातील गोरगरीब पालक विद्यार्थी यांच्या मागणीला सहकार्य करून आरटीईची नवीन १५-१५ प्रवेश प्रक्रियेची अट रद्द केली आहे. पालकांच्या लढ्याला यश आले आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी निवेदनाद्वारे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचे आभार मानले आहेत.