- भारतीय स्त्री शक्तीचा स्थापना दिवस साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२२) :- भारतीय स्त्री शक्तीचा १५ मे रोजी स्थापना दिवस होता. ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वैशाली देशपांडे, ज्योतीताई पठाणियां ( चैतन्य महिला मंडळ संस्थापिका) व माधव खोत उपस्थित होते.
समाजात परिवर्तन घडवून समाज हिताचे कामं महिलांच समर्थ पणे करू शकतात, असे प्रतिपादन माधवजी खोत ह्यांनी केले. वैशाली देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले समानता म्हणजे पुरूषाबरोबर स्पर्धा किंवा बरोबरी नव्हे तर समाजाचा कणा असणाऱ्या कुटुंबात निर्णायक प्रक्रियेत महिलेच्या बरोबरीने सहभाग होय. ज्योती पठाणियांनी सखी मंच वन स्टॉप सेंटरच्या विषयी माहिती देत पिडित महिलांना कसा आधार दिला जातो हे समजावून सांगितले.
माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे म्हणाल्या, कुटुंबव्यवस्था हा आपल्याकडील महत्त्वाचा सामाजिक घटक आहे आणि त्याबद्दल अनेक जण अभिमानाने बोलतही असतात. या व्यवस्थेचे फायदे-तोटे आहेत; परंतु या व्यवस्थेमुळे समाजाचा डोलारा उभा आहे, हे नाकारता येणार नाही. चंगळवादी संस्कृतीमुळे या व्यवस्थेला धक्के जरूर बसत आहेत; परंतु त्याची पाळेमुळे घट्ट असल्याने तडे गेलेले नाहीत. स्त्री आणि पुरुष ही संसाररथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते खरे; परंतु संसारथाचा तोल सावरला जातो, तो स्त्रीमुळेच.
राष्ट्र निर्माण में स्त्री शक्ति व भारतीय नारीवाद ह्या पुस्तकांचे प्रकाशन ही झाले. या प्रसंगी भारतीय स्त्रीशक्ती जागरण पिंपरी चिंचवड शाखेला शुभेच्छा देण्यासाठी माजी उपमहापौर तथा नगरसेविका शैलजा मोरे, नगरसेविका शर्मिला बाबर, लीना आढाव, मिताली गिध असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचलन मनाली जोशी ने केले, प्रास्ताविक निवेदिता कच्छवा ह्यांनी केले तर आभार अनघा शेवळे यांनी मानले.